आंध्र प्रदेश
?आंध्र प्रदेश भारत |
|
— राज्य — | |
|
|
|
|
गुणक: | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १,६०,२०५ चौ. किमी (६१,८५५ चौ. मैल) |
राजधानी | हैदराबाद |
मोठे शहर | हैदराबाद |
जिल्हे | २३ |
लोकसंख्या • घनता |
४९ (५ वे) (२०११) • ३०७.८/km² (७९७/sq mi) |
भाषा | तेलुगू |
राज्यपाल | ई.एस.एल. नरसिंहन |
मुख्यमंत्री | चंद्राबाबू नायडू |
स्थापित | १ नोव्हेंबर १९५६ |
विधानसभा (जागा) | Bicameral (295+90) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-AP |
संकेतस्थळ: आंध्र प्रदेश संकेतस्थळ | |
राजचिन्ह |
गुणक:
आंध्रप्रदेश (तेलगु- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे. लोकसंख्येनुसार आंध्र प्रदेश भारतात दहावे राज्य आहे. या राज्याची नवीन राजधानी गुंटुर जिल्ह्यात गुंटुर शहराच्या पुर्वेला विकसीत करणार आहेत. काही काळा पर्यंत हैदराबाद ही अांध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी राहणार आहे.
अनुक्रमणिका
इतिहास[संपादन]
१ नोव्हेंबर इ.स. १९५६ मधील राज्य पुनर्रचना कायद्याने तेलगु भाषकांचे जुने हैद्राबादमधून आंध्रप्रदेश निर्माण झाले, मराठी भाषकांचा प्रदेश जुने हैद्राबादमधून महाराष्ट्राला जोडला गेला, कन्नड भाषकांचा प्रदेश जुने हैद्राबादमधून कर्नाटाकाला जोडला गेला.
भूगोल[संपादन]
- आंध्र प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ २,७५,०६८ वर्ग किमी आहे.
- राज्याला ९७२ किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
- आंध्रप्रदेश राज्य अक्षांश- १२°४१' ते २२°उत्तर व रेखांश ७७° ते ८४°४०' पुर्व मध्ये वसलेले आहे.
- राज्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ८,४६,५५,५३३ असून लोकसंख्येची घनता ३०७.८प्रति वर्ग किमी आहे.
चतुःसीमा[संपादन]
- पूर्वेस- बंगालचा उपसागर
- पश्चिमेस- कर्नाटक राज्य
- उत्तरेस-तेलंगणा राज्य
- दक्षिणेस- तमिळनाडू राज्य
- ईशान्येस- छत्तीसगढ राज्य, ओडिशा राज्य
जिल्हे[संपादन]
यावरील विस्तृत लेख येथे पहा.
आंध्र प्रदेशमध्ये २३ जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी अशी -
- आदिलाबाद
- अनंतपुर
- चित्तूर
- पूर्व गोदावरी
- गुंटुर
- हैदराबाद
- कडप्पा
- करीमनगर
- खम्मम
- कृष्णा
- कुर्नूल
- महबूबनगर
- मेदक
- नालगोंडा
- नेल्लोर
- निजामाबाद
- प्रकाशम
- रंगारेड्डी
- श्रीकाकुलम
- विशाखापट्टणम
- विजयनगर
- वारंगळ
- पश्चिम गोदावरी
राज्यातील पर्यटनस्थळे[संपादन]
चारमिनार[संपादन]
चारमिनार हा मोहम्मद कुली कुतब शहा यांनी १५९१ साली बांधला. शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो. चारमीनार हे नाव त्याच्या बांधलेल्या पध्दतीवरून हे नाव मिळाले. चारमिनार हा ५४ मीटर उंच आहे.
तिरुपती[संपादन]
तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन[संपादन]
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे हैद्राबादपासून २२० किमी अंतरावर आहे.
एथिपोथला धबधबा[संपादन]
राज्याची प्रतिके[संपादन]
प्रतीक | कलश |
---|---|
भाषा | तेलगु |
गीत | मा तेलगु तल्लीकी |
नृत्य | कुचिपुडी |
प्राणी | काळवीट |
पक्षी | चास |
फुल | वॉटर लिली |
वनस्पती | कडुनिंब |
खेळ | कबड्डी |
बाह्य दुवे[संपादन]
|
महाराष्ट्र | महाराष्ट्र, छत्तीसगढ राज्य | ओडिशा राज्य | ||
कर्नाटक राज्य | बंगालचा उपसागर | |||
आंध्र प्रदेश | ||||
कर्नाटक राज्य | तमिळनाडू राज्य | बंगालचा उपसागर |