भारताने चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले तरी ऑस्ट्रेलियन संघाने मालिका २-० ने जिंकली. दरम्यान, आम्ही सकारात्मक खेळ केला. मैदानावर कठीण प्रश्नाला तोंड दिले. या संघात दम आहे. कोणत्याही क्षणी आम्ही हाताला पांढरा रुमाल बांधून शरणागती पत्करली नाही. सतत लढत राहिलो,असे प्रतिपादन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले.